![]() |
चंदगड शहरात गळती लागल्यामुळे रस्त्यावरुन वाहून वाया जात असलेले पाणी. |
चंदगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील नळपाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली असल्याने दोन दिवस या रस्त्यावर पाणी झीरपत आहे. वेळीच ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी वाहणार आहे. त्यामुळे चंदगड नगरपंचायत प्रशासनाने वेळीच जलवाहिनीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. चंदगड येथील आंबेडकर रोडवर चर्च जवळील चढतीला नळपाणी जलवाहिनीला तीन दिवसा पासुन गळती लागली आहे. गळती लागलेले ठिकाणी तीव्र उताराचे आहे. त्यामुळे सुरुवातीला गळतीच्या ठिकाणी पाणी झिरपत होते. हळूहळू झिरपण्यात वाढ होत जाऊन आता तीसऱ्या दिवशी गळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने या ठिकाणची गळती त्वरीत काढावी अशी मागणी होत आहे. एकीकडे शहरात पाणीपुरवठा कमी होत असल्याची लोकांची ओरड असताना गळतीमुळे पाणी वाया जात आहे. यासह शहरातील अन्य दोन ठिकाणी लागलेली गळती आहे. ती सुद्धा काढून वाया जाणारे पाणी वाचवणे जरूरीचे आहे.
No comments:
Post a Comment