![]() |
श्रीनिवास घाडगे |
कोल्हापूर लोकसभा निवडणूक चांगल्या प्रकारे भयमुक्त वातावरणात पार पाडावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. यासाठी पोलिस दल उत्तम प्रकारे कार्यरत आहे, असे गडहिंग्लज विभागाचे पोलिस उपअधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज (ता. 9) सकाळी चंदगड पोलीस ठाण्यात कार्यालयीन कामकाज व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती तसेच सुचना करण्यासाठी आले होते.
पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ``आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज उपविभागातील वातावरण नेहमी चांगले आहे. निवडणुकी दरम्यान या विभागात संवेदनशील असे काही नसल्याने या विभागात चांगल्या प्रकारे मतदान प्रक्रिया पार पाडली जाते. लोकसभेचे मतदान निर्भयपणे पार पडले. जिल्ह्यातील पोलीस दल याकरिता सतर्क असेल. नागरीकांनी मतदानपुर्वी किंवा मतदान दरम्यान काही तक्रार असल्यास निवडणूक विभाग किंवा पोलिस विभागाकडे संपर्क साधावा. निवडणूक आयोगाने ही निवडणूक निर्भयतेने पाडावी म्हणून सर्व यंत्रणेला सतर्क असल्याचे श्री. घाडगे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment