![]() |
आजरा येथील राजू पोतनीस यांना मुंबई येथे निवडीचे पत्र देताना मान्यवर. |
आजरा तालुक्यातील राजु पोतनिस यांची राज्य सरपंच परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये नुकताच निवड करण्यात आली आहे. आजरा तालुक्यातील राजु पोतनिस यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीची नोंद घेवुन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारणीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र पोतनिस यांना प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव, उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवण्यात आले आहे. पोतननिस यांच्या निवडीबद्धल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment