राजगोळी येथील ओलम साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची 16 मार्चला सांगता – भरत कुंडल यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2020

राजगोळी येथील ओलम साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची 16 मार्चला सांगता – भरत कुंडल यांची माहीती

राजगोळी (ता. चंदगड) येथील ओलम ॲग्रो प्रा. लि. (हेमरस) कारखाना.
कोवाड / प्रतिनिधी
राजगोळी (ता. चंदगड) येथील ओलम ॲग्रो प्रा. लि. (हेमरस) राजगोळी साखर कारखान्याच्या सन 2019-20 चा गळीत हंगामाची सांगता 16 मार्च 2020 रोजी होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रक ओलम कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिले आहे.
भरत कुंडल
या वर्षी ओढवलेली नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थिती आणि मुळातच कारखाने हे वेळाने सुरु झाले. सध्या शिल्लक ऊसाचे क्षेत्र लक्षात घेता दर वर्षी पेक्षा यावर्षी किमान आठवडाभर तरी हंगाम हा लांबणार. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा ऊस अजून शिल्लक आहे त्यांनी संबंधित शेती कार्यालयाशी संपर्क साधून दिनांक 15 मार्च 2020 रात्री बारापर्यंत कारखान्यात पोच होईल अशा पद्धतीने आपला ऊस पाठविण्याचे नियोजन करावे. 15 मार्च नंतर कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी. ळेत सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस पाठविण्याचे आवाहन मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे. आज अखेर 10 व्या गळीत हंगाम मध्ये आजवरचे उचांकी असे एकूण 6 लाख 31 हजार 814 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. सन 2019-20 चा गळीत हंगाम हा यशस्वीरीत्या पूर्ण होत असल्याबद्दल कारखाना व्यवस्थानाने सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे, कामगार, तोडणीदार तसेच वाहतूकदार या सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. 10  फेब्रुवारी पर्यंत आलेल्या ऊसाची बिले हि संबंधित खातेदाराच्या खात्यावर या आधीच जमा करण्यात आली आहे. 11 ते 29 फेब्रुवारी पर्यंत आलेल्या ऊसाची बिले हि येत्या पाच दिवसात जमा करत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे. 



No comments:

Post a Comment