![]() |
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे आगीत जळून खाक झालेली गवत गंजी. |
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील गावडू धनाजी पाटील व धोंडीबा गणपती पाटील यांच्या गवत गंज्याना आग लागून अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारी दिडच्या सुमारास हि घटना घडली.
दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनासाठी वर्षभर लागेल इतका वैरण साठा या ठिकाणी करुन ठेवला होता. कालकुंद्री येथील अखंड नाम सप्ताहामुळे दहा दिवस कामकाज बंद असल्यामुळे गवत रचण्याचे काम थांबवण्यात आले होते. त्यामुळे आणलेले धोंडीबा यांचे तीन ट्रॉली पिंजर तर गावडू यांचे चार ट्रॉल्या पिंजर व कराड त्यांच्या ताम्रपर्णी नदी काठावरील नावे जवळच्या जागेत ठेवण्यात आले होते. याला काल अचानक आग लागली. सुरुवातीला धोंडीबा यांच्या गवत गंजीला लागलेली आग एका महिलेने पाहिल्यानंतर आरडाओरड केली. वाऱ्यामुळे सर्व गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. नदीकाठी डिझेल इंजिन लावून आग विझवण्याचा प्रयत्न फोल ठरला. चोवीस तास उलटून गेले तरी आग धुमसत होती. घटनेचा पंचनामा तलाठी अरुण शिंदे, पोलिस पाटील संगीता कोळी, कोतवाल शशिकांत सुतार व पंचांच्या समक्ष करण्यात आला. आग लावण्याचा प्रकार जाणून-बुजून करण्यात आल्याचा संशय उपस्थितांतून व्यक्त करण्यात येत होता.
No comments:
Post a Comment