तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी विकासासाठी करावा - प्रा. डॉ. नितिन देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2020

तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी विकासासाठी करावा - प्रा. डॉ. नितिन देसाई

हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीयविज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमावेळी दिपप्रज्वलन करताना मान्यवर.
मजरे कार्वे /प्रतिनिधी :-
कोल्हापूर जिल्ह्यातील तांदळाच्या जाती ह्या उत्तम गुणवत्तापूर्ण असून त्यांचा विकास, संवर्धन आणि संगोपन करा म्हणजे आपल्या पुढील पिढीला त्याचा उपयोग होईल.दर्जेदार उत्पादनाची मागणी ही देशातच नव्हे तर परदेशातही आहे,त्यामुळे उत्कृष्ठ शेतीमाल आपल्याला निर्यात करता येईल.या साठी तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजेत असे मत डॉ. नितीन देसाई यांनी काढले.
मराठी विज्ञान परिषद आणि भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीयविज्ञान दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते.डॉ. नितीन देसाई हे अमीठी इन्स्टिट्यूट मुंबई चे संचालक व जिवतंत्रज्ञान विषयाचे संशोधक आहेत. जैवतंत्रज्ञानाचे मानवी जीवनातील योगदान या विषयावर ते बोलत होते.ते म्हणाले,आपल्या देशात शेतीसाठी लागणारी रोपे पारंपरिक पद्धतीने तयार करणे हे खूप वेळखाऊ व कठीण काम आहे.परंतु उतीसंवर्धन जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत कमी कालावधीत लाखोंच्या संख्येने एकाच वाणाची सक्षम व मजबूत रोपे तयार करता येतात. तसेच पिकांना लागणाऱ्या रोगांपासून रक्षण करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आली आहेत.जैवतंत्रज्ञानामध्ये वनस्पतीशास्त्र,प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र आशा अनेक ज्ञानशाखा आहेत. शेती, पशुपालन,उद्योग,औषधनिर्मिती, आरोग्य,पर्यावरण या क्षेत्रात क्रांती घडत आहे त्यामुळे एक सक्षम करियर म्हणून विद्यार्थ्यांनी जैवतंत्रज्ञान या उपयोजित शास्त्राकडे वळावे.असे आवाहन डॉ पाटील यांनी केले.यावेळी गोपाळराव पाटील म्हणाले, एकविसाव्या शतकात सेंद्रिय शेती ही आरोग्यासाठी महत्वाची आहे.चंदगड तालुक्यात संशोधन करण्यास वाव आहे.तांदूळ, नाचणी,ऊस या पिकावर संशोधन करून त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहीजेत. सध्या चे युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे, तरुणींच्या प्रतिभेला, प्रज्ञेला,चिकाटीला,कल्पकतेला विज्ञान खुणावत आहे त्यामुळे महिलांनी संशोधनाकडे वळावे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.ए. आर.चव्हाण यांनी केले तर प्राचार्य कल्याणराव पुजारी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.एन.एस.पाटील यांनी रामन परिणाम व पर्यावरण संरक्षण साठी आपले योगदान काय असावे यावर मार्गदर्शन केले.  यावेळी प्राचार्य डॉ. पी.वाय.निंबाळकर ,प्राचार्य.ए. एस.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात कोवाड कॉलेजचे प्राचार्य ए. एस.पाटील सर यांनी गणितावर लिहलेले जादूचे चौकोन या पुस्तकावर आधारित विविध स्पर्धाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी यामध्ये यश संपादन केले.यावेळी प्रा.एस. टी. कदम,प्रा.एस.के.नेर्ले, प्रा.पुंडलीक दरेकर, सुषमा सुभेदार , सौ.गवसेकर ,विनायक सावंत प्रा.शाहू गावडे,महाविद्यालयातील सर्वं प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ. राजेश घोरपडे यांनी केले आणि सूत्रसंचालन प्रा.नंदकुमार पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment