साहित्यिक रणजित देसाई यांची ग्रंथसंपदा प्रदान करताना सुरेश नाईक
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास गावातील इयत्ता दहावी (बॅच २००२) विद्यार्थ्यांकडून टाइल्स फरशी बसवून देण्यात आली. तर माजी उपसरपंच सुरेश नाईक यांनी साहित्यिक पद्मश्री रणजित देसाई यांच्या सर्व ४२ पुस्तकांचा संच देणगी दाखल सुपूर्द केला.
मान्यवरांसह दहावी बॅच २००२ चे विद्यार्थी. |
कविता लेखन स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना प्रथम क्रमांक विजेती सुचिता भातकांडे. |
या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सुरेश नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक एम बी पाटील उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष के जे पाटील यांनी तर प्रस्ताविक प्रा व्ही आर पाटील यांनी केले. यावेळी विनायक पाटील, श्रीकांत पाटील, सुखदेव भातकांडे, क पा पाटील आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी वाचनालय पदाधिकारी, देणगीदार विद्यार्थी, कवितालेखन स्पर्धेतील विजेते, वाचक, हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार युवराज पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment