कालकुंद्री येथे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2019

कालकुंद्री येथे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

सुमित भातकांडे
कालकुंद्री / प्रतिनिधी
ऊस पिकाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या सुमित सुखदेव भातकांडे (वय-24, रा. कालकुंद्री, ता. चंदगड) या युवकाचा ओढ्याच्या पाण्यात तोल जावून पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला. आज सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. वडील सुखदेव शिवाजी भातकांडे यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली. 
कुमार केंद्रशाळेचे शिक्षक सुखदेव भातकांडे यांना सकाळी सात वाजता शाळेत सोडून सुमित मोटरसायकलने कुदनुर ओढा पुलानजिक त्यांच्या भांडारमाळ नावाच्या शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेला होता. यावेळी ओढ्याच्या पाण्यात पाय घसरुन पडल्याने बुडून त्यातच त्याचा मृत्यू झाला. तरुण पणातच सुमितच्या आकस्मिक मृत्यूने भातकांडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे शिक्षण बीई पर्यंत झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलिस नाईक संतोष साबळे तपास करत आहेत. 


फोटो – सुमित भातकांडे

No comments:

Post a Comment