![]() |
चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. एच. एस. वनमोरे, शेजारी प्राचार्य डॉ. पाटील, डॉ. मासाळ, प्रा.साळुंखे व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
मानव जातीच्या अस्तित्वासाठी सध्याचा कालखंड हा संघर्षामय कालखंड आहे. भविष्यकाळात टिकायचे असेल तर पर्यावरण सजगतेशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी होऊ नये. माता-पिता व गुरू यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. संस्काराची शिदोरी जपून ठेवली तर सांस्कृतिक आक्रमणांचा सामना करणे सहज शक्य आहे असे प्रतिपादन डॉ. एच. एस. वनमोरे यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयतील `भूगोल दिनाच्या` कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.
भुगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. एस. मासाळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वनमोरे पुढे म्हणाले “प्रगत तंत्रज्ञानाचा वापर विधायक दृष्टिकोनातून व्हायला हवा. आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक आहे. संवेदनशील युवा पिढी रचनात्मक कार्यातून कर्तृत्वाचे अनेक मानदंड निर्माण करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. नियोजन, योग्य दृष्टिकोन, मार्गदर्शन, आत्म परिक्षण, दीर्घ अभ्यास यांच्याद्वारे युवा पिढी देशाला प्रगतीपथावर नेण्यास निश्चितच सक्षम होईल.``
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. पाटील यांनी `विद्यार्थ्यांनी संशोधकवृत्तीची जोपासना करून आपले ध्येय साकार करावे असे आवाहन केले.` यावेळी भूगोल दिनाचे औचित्य साधून भित्तिपत्रक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला. संशोधन पध्द्तीस अनुसरून तयार केलेला भित्तीपत्रकांचा गौरव करण्यात आला व विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. टी. ए. कांबळे व डॉ. आर. एन. साळूके यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला प्राधापक, कर्मचारी व विद्यार्थ्यीं उपस्थित होते. डॉ. कपिल पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment