त्वरीत मदत जाहीर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
बळीराजा संघटनेच्या वतीने पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार विनोद रणवरे यांना देताना नितीन पाटील व सहकारी. |
चंदगड / प्रतिनिधी
मागील आठवड्यात झालेल्या जोरदार वादळी पावसाने चंदगड तालुक्यातील ऊस,भात व केळी शेती जमिनदोस्त झाली. या वादळात ऊस,भात,व केळी आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच खरीप पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. कष्टाने पिकवून हातातोंडाशी आलेले पिक गेल्याने बळीराजा हताष झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी तुफानी पावासाने चंदगड तालुक्याला तडाखा दिला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असतांना पावसाने शेतकऱ्यांची नगदी पिके हातची गेली आहेत. चंदगड तालुक्यातील साधारण बारा हजार हेक्टर ऊस शेती संकटात आली आहे. तर दुसरी नगदी पिके असलेल्या काजू, केळीच्या बागा देखिल भुईसपाट झाल्या आहेत. अशा संकटाच्या काळात शासनाने त्वरीत पंचनामे करुन नुकसानीची भरपारई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे.
जाहिरातजाहिरात |
त्यामुळे तात्काळ नुकसानीचा पंचनामा करुन मदत करण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबतचे निवदेन तहसिलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले. निवेदनावर बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, कृष्णा पाटील, मारुती पाटील, देवदास पाटील, सिताराम बोंगाळे, संजय मोरे, शंकर पडते, रामराव झाजरी, तुषार शिंदे, संजय गावडे, निवृत्ती मसुरकर आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
No comments:
Post a Comment