दुर्गम व डोंगराळ भागातील नेटवर्क संबंधी तक्रारी लवकर दूर कराव्यात - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2020

दुर्गम व डोंगराळ भागातील नेटवर्क संबंधी तक्रारी लवकर दूर कराव्यात - आमदार राजेश पाटील

मोबाईल व दूरध्वनी नेटवर्क संदर्भात आयोजित बैठकीत बोलताना खासदार संजय मंडलिक , शेजारी आमदार राजेश पाटील , प्रकाश आंबिटकर


तेऊरवाडी / प्रतिनिधी

      सध्याच्या युगात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेला असाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे दूरध्वनी सेवेसंदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्याचा सर्व्हे करून येत्या पंधरा दिवसांमध्ये अहवाल देण्याच्या सूचना खासदार संजय मंडलिक यांनी बीएसएनएल'सह इतर खाजगी सेवा पुरवणाऱ्या दूरध्वनी कंपन्यांना केली. 

         या संदर्भात कोल्हापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गगनबावडा आदी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये बीएसएनएल सेवेबरोबरच इतर खाजगी दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. अनेक वेळा नेटवर्क गायब होणे,याशिवाय इंटरनेटला स्पीड नसणे अशा बाबी वारंवार उद्भवत आहेत. अनेक वेळा तक्रार करूनहीयाकडे दुर्लक्ष होत असल्याने आज खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली दूरध्वनी कंपन्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.           या बैठकीला आमदार प्रकाश अबीटकर, आमदार राजेश पाटील ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत बोलताना दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना कोणत्या अडचणी आहेत. याशिवाय  ग्रामीण भागात नेमक्या काय समस्या आहेत याची माहिती अधिकाऱ्याकडून घेतली. रेंज नसले कारणाने एका फोन वर होणाऱ्या कामासाठी पुर्ण दिवस वाया जातो, कॅाल ड्रोप होणे, कोविड महामारीमुळे सध्या शिक्षण ऑानलाईनपध्दतीने सुरु असून मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या वर्कर्सचे वर्क फ्रॉम र्म होम सुरु आहे.  

      या बैठकीत खाजगी कंपन्यांकडून देखील त्यांचे असणारे मोबाईल टावर्स आणि ग्रामीण भागामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा मध्ये येणाऱ्या अडचणीयाची माहिती त्यांनी घेतली. परिणामी ज्या- ज्या समस्या आणि अडचणीआहेत या संदर्भात बीएसएनएलच्याअधिकारी आणि खासगी दूरध्वनी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून त्याचा संयुक्त अहवाल येत्या पंधरा दिवसात देण्याच्या सुचना या बैठकीत केल्या. काही ठिकाणी नवीन मोबाईल टावर उभारणे गरजेचे आहेत. मात्र काही वेळाजागेची अडचण तसच वनविभागाचे नियम आणि केबल टाकण्यासाठी करावी लागणारी रस्त्यांची खुद्दाईआदी समस्या असल्याच बीएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक संजयकुमार चौधरी यांनी सांगितले. यावर बीएसएनएलचे अधिकारी आणि इतर खासगी दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि खासदार संजय मंडलिक यांनी संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.               याशिवाय पाहणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत सात डिसेंबरला वनविभाग त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान मोबाईल टावर उभे करण्यासंदर्भात कंपन्या कधी जाहिरात देत नसतात त्यामुळे लोकांनी अशा खोट्या जाहिरातींना बळी पडू नये असे आवाहनही केलं.माणसांशी माणस जोडणार नात अशी ओळख असणाऱ्या दूरध्वनी सेवेचा बोजवारा उडत असल्याने ग्राहकांसोबतच बँका, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली असल्याच सांगितले.यावेळी आमदार प्रकाश आबीटकर यांनी राधानगरी आणि आजरा तालुक्यामध्ये दूरध्वनी सेवेचा बोजवारा उडत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. तर या बैठकीला बीएसएनएलचे उपमुख्य महाप्रबंधक शिवराम कुलकर्णी, आरएफओ माळी, मंडल अभियंतास्नेहा विचारे, यांच्यासह जीओचे आकाश सावंत, एअरटेलचे उज्वल  जावळेकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment