महाराष्ट्रात शाळा सूरू होत असल्याने शालेय
वर्ग सॅनिटाईझ करताना अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूलचे कर्मचारी.
तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा
कोरोणामुळे २३ मार्चपासून बंद असलेल्या महाराष्ट्रातील शाळा २३ नोव्हेंबर रोजी चालू होत असल्याने सर्वच शाळानी जय्यत तयारी केली आहे . संपूर्ण शाळा सॅनिटाइझ केल्या असून तब्बल नऊ महिन्यानी शाळांची घंटा खणखणणार आहे.
कोरोनामुळे मार्च महिण्याच्या २३ तारखेनंतर सर्वच शाळा बंद करण्यात आल्या . यानंतर तीन वेळा शिक्षण विभागाने शाळा चालू करण्याच्या तारखा जाहिर केल्या . पण कोरोणाग्रस्थांची संख्या वाढत गेल्याने शिक्षण विभागाला निर्णय बदलावा लागला . अखेर उदया सोमवार दि .२३ नोव्हेंबर रोजी मुंबई व पुणे शहर वगळता तसेच स्थानिक प्रशासनाचा विचार घेऊन इयत्ता ९वी ते १२ पर्यंतचे वर्ग चालू होत आहेत . यामुळे स्थानिक प्रशासन , शाळा व्यवस्थापन कमिटी , ग्राम पंचायत यांच्या कडून सर्व शाळा सॅनिटाईझ करण्यात आल्या आहेत . तसेच शाळेत येणाऱ्या सर्वांची रोज थर्मल स्कॅनिंग , ऑक्सिमिटर तपासणी व कोविड १९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे . या वर्गाना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची कोरोणा चाचणीचे घेण्यात येत आहे . सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू होत असल्या तरी अजून धोका टळलेला नाही . त्यामुळे पालक , विद्यार्थी व शिक्षक यानी काळजी घेणे गरजेचे आहे . सध्या मात्र शाळांच्या घंटा खणखणणार असून विद्यार्थी कितपत शाळामध्ये अपस्थित राहणार ? हे या आठवडयात समजणार आहे.
No comments:
Post a Comment