चंदगड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बैठकांना ऊत, राजकीय खलबते - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2020

चंदगड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बैठकांना ऊत, राजकीय खलबते

नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड  तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने गावा गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.राजकिय खलबते जोरात सूरू असून राजकीय चर्चांना ऊत आला आहे.शासनाने सरपंच पदांचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करणार असल्याने या निवडणुकीतील ईर्ष्याच कमी झाली आहे.   
        तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून गल्लीबोळातील राजकीय कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे .ग्रामपंचायतींवर आपल्याच गटाचे वर्चस्व रहावे यासाठी पक्षीय पातळीवरचा विचार न करता स्थानिक राजकारण , गटा - तटाला महत्त्व आले आहे . उमेदवारीसाठी भाऊबंदकी , गोतावळ्यातील कोणाचीतरी वर्णी कशी लागेल यासाठी आघाडीप्रमुख कामाला  लागले आहेत . तर काहीजण सत्ताधारी मंडळीतील विरोधकांचा पत्ता कसा कापता येईल या व्यूहरचनेत गुंतले आहेत . तोच पाच वर्षाची ईर्षा आणि वैयक्तिक वाद राजकारणातील कलह , मागील युतीत बिघाड या अनेक कारणांनी उफाळून आलेली ईर्षा नुकसान जाहीर झालेल्या तालुक्यातील ४१ ग्रामपंचात यांच्या निवडणुकीच्या सुरवातीपासूनच गावागावात दिसून येत आहे. 
        तालूक्यात राजकीय पक्षांपेेक्षा गटाच्या राजकरणाला फार महत्त्व आहे, त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी आणि वैयक्तिक ग्रामपंचा भेटीगाठी घेऊन आपली भूमिका मतदारापर्यंत पोहोचवण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे . आमदार राजेश पाटील यांच्या म्हाळेवाडी आणि माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या बसर्गे,जि प सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या कोवाड, तर माजी सभापती शांताराम पाटील यांच्या धुमडेवाडी, माजी सभापती भरमाण्णा गावडे यांच्या हलकर्णी गावासह , कालकुंद्री , राजगोळी बुद्रुक , मांडेदुर्ग , दाटे , हजगोळी ,  , किणी , मलतवाडी , नांदवडे , शिनोळी , तुडये,या राजकीय दृष्ट्या संवेदनशील  गावांत निवडणुका होत आहेत . त्यामुळे लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे . ज्या गावात मतदान आहे त्या गावातील पुढाऱ्यांकडून गावातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी व्यस्त आहेत . तालुक्यात पंधरा वर्षांपूर्वी  भरमूआण्णा विरुद्ध नरसिंगराव पाटील गट अशी लढत व्हायची . कालांतराने दौलत कारखान्याच्या संघर्षातून गोपाळराव पाटील हे नवे नेतृत्व उदयाला आले .                    अलीकडच्या दहा वर्षांत यामध्ये संभाजीराव शिरोलीकर , शिवसेना , स्वाभिमानी शेतकरी संघटना , आप्पी पाटील तसेच आताच्या विधानसभा  निवडणुकीत शिवाजी पाटील ही नवी नेतृत्व उदयाला आली . त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे .हजगोळी , हलकर्णी , होसूर , इब्राहिमपूर , कळसगादे , कानडी , करेकुंडी , केरवडे - वाळकुळी , किणी , मलतवाडी , मुगळी , नागवे - ईनाम कोळींद्रे , नांदवडे , पुंद्रा , सुरुते , शिनोळी खुर्द , तुडये , चिंचणे,बुक्कीहाळ , देवरवाडी , ढोलगरवाडी , धुमडेवाडी , जांबरे , कौलगे , किटवाड , माडवळे , म्हाळेवाडी , पाटणे , सुंडी , तावरेवाडी , कालकुंद्री , कोवाड , राजगोळी बु . , मांडेदुर्ग , आसगाव , बसर्गे , बागिलगे , बोंजूर्डी , दाटे , दिंडलकोप , घुल्लेवाडी ,  या गावांत निवडणुका होत आहेत.



No comments:

Post a Comment