पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे जन आंदोलन समिती व सर्व श्रमिक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड तालुक्यातील तरुणांवर 'रविकिरण पेपर मिल' च्या मालकांनी चालवलेल्या अन्याया विरुद्ध आज कामगार अन्याय निवारण परिषद आयोजित केली होती.
किमान वेतन मिळावे, कामगारांना कायमस्वरूपी सेवेत कायम समावेश करावा, निलंबित कामगारांना सेवेत तात्काळ रुजू करून घ्यावे अन्यथा मोठे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व श्रमिक संघटना अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिला.
या कारखान्यात भागातील ६० पेक्षा अधिक कामगार आहेत.कमी पगारामध्ये जास्त काम करून घेणे, महागाई भत्ता नाही, कामगारांना काढून टाकणे अशा विविध मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांनी शांततेत संप पुकारला पण कारखानदारांना कामगारांची दया आली नाही.
यावेळी बोलताना ॲड. संतोष मळविकर म्हणाले, पेपर मिलच्या मालकांनी चंदगड तालुक्यातील कामगारांवर मुजोरी कसरून आपली आर्थिक तिजोरी भरात असतील तर चंदगडच्या लाल मातीचा हिसका दाखवू असा धमकी वजा इशारा दिला. माजीमंत्री भरमुआण्णा पाटील यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, सुनील शिंत्रे, अनिल तळगूळकर, यांची भाषणे झाली. १० दिवसात कामगारांचा प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात करण्यात येईल अशा प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिल्या. पांडुरंग बेनके यांनी आभार मानले. यावेळी तानाजी गडकरी, आर. जी. पाटील,माया पाटील,जोतिबा जोशीलकर,आनंदा भोसले मारोत गावडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment