दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीण उगवण क्षमता चाचणी करावी - कृषी अधिकारी किरण पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2021

दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीण उगवण क्षमता चाचणी करावी - कृषी अधिकारी किरण पाटील

सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी ?याचे मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी किरण पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        गेल्या दोन वर्षात झालेला जोरदार पाऊस, सततचे लॉक डाऊन यामूळे सोयाबिण बियाणांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामूळे चंदगड मधील शेतकऱ्यांनी आपल्या जवळील असणाऱ्या सोयाबीण बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी म्हणजे दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, असे विचार चंदगडचे तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी व्यक्त केले.

           तेऊरवाडी  तालुका चंदगड  येथे शेतकऱ्यांशी  सोयाबीन बियाणांची पेरणी व उगवण क्षमता चाचणी या विषयावर संवाद साधताना कृषी अधिकारी श्री पाटील बोलत होते.

         ते पुढे बोलताना म्हणाले, ``सोयाबिणची  मळणी ,साठवण , हवामान व कालावधी आदिंचा परिणाम सोयाबिणच्या उगवण क्षमतेवर होतो . दुबार पेरणीचे संकट टाळायचे असेल तर शेतकऱ्यानी उगवण क्षमता चाचणी करणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उगवण चाचणी करावी. सध्या बियाणांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्वताकडे असणाऱ्या बियाणांचा वापर करावा काही अडचण असल्यास कृषी विभागाचे कृषी सहाय्यकांशी संपर्क साधण्याचे आवाहन  कृषी अधिकारी किरण पाटील यांनी केले. यावेळी कृषी मंडल अधिकारी अक्षय गार्डे कृषी सहाय्यक अतिष चव्हाण, गोपाळ गव्हाळे यांच्यासह एम. ए. पाटील, पुंडलिक पाटील, एस. के. पाटील,  सुबराव गुडाजी, विठ्ठल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment