कु.गौरी मिलिंद निकाळे |
मुंबई /प्रतिनिधी
विक्रोळी कनमवार नगर येथील भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील कु. गौरी मिलिंद निकाळे या विद्यार्थ्यीनीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्ड अंतर्गत दहावीच्या परिक्षेत 91.60 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.
गेल्या दीड वर्षापासून कोविड 19 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने फक्त ऑनलाईन क्लास सुरु होते शासनानेही कोरोना महामारीमुळे दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेऊन नववी व दहावीच्या इतर विषयाच्या मुल्यकंनावर तसेच असायमेटवरून दहावीचा निकाल लावलयामुळे डाॅ बाबासाहेब आबेडकर विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून कु.गौरी मिलिंद निकाळे हिने एक जिद व मेहनत घेऊन यश मिळवले आहे.तिने तीला शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल कुंटुब व परिवार वनिता फाऊंडेशन याच्या कडून तिचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment