मराठा आरक्षण आंदोलन विशेष - माझे काय व्हायचे ते होऊदे पण समाजाला वेठीस धरणार नाही - खासदार संभाजीराजे, मराठा समाजाच्या मागण्यासाठी खास. सभाजीराजेचे आझाद मैदानावर मरण उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2022

मराठा आरक्षण आंदोलन विशेष - माझे काय व्हायचे ते होऊदे पण समाजाला वेठीस धरणार नाही - खासदार संभाजीराजे, मराठा समाजाच्या मागण्यासाठी खास. सभाजीराजेचे आझाद मैदानावर मरण उपोषण

 

मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले खासदार छत्रपती संभाजीराजे.

मुंबई (नंदकुमार ढेरे ,थेट आझाद मैदानावरून) : 

          सरकारने मराठा समाजाच्या मागण्याबाबत दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषण करण्या शिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. या उपोषणाला मी एकटाच बसणार आहे. माझे काय व्हायचे ते होऊ दे, पण समाजाला वेठीस धरणार नाही, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनात चंदगड पत्रकार संघाच्या वतीने सहभागी झालेले चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे.

           मराठा आरक्षणासह विविध आश्वासित मागण्याच्या पुर्ततेसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणास राज्यभरातुन उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळत आहे. आझाद मैदानावर राज्यातून हजारो लोकांचे जथ्थे दाखल होत आहेत. तसेच संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध शहरे, गावांमध्ये साखळी आंदोलने, उपोषण केली जात आहेत. मराठा आरक्षणासाठी पुकारलेले बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. उपोषणकर्ते व कार्यकर्त्यांचा आझाद मैदानातच मुक्काम मांडला आहे.

आंंदोलकांना काळ्या फिती लावताना मराठा बांधव.

                     मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजे यांनी केला आहे. मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी वेळही लागू शकतो. पण आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. १५ दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो असे सरकारने सांगितले होते. त्यानंतर आम्ही नाशिकला मुक आंदोलन थांबवले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. 

          आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला ४०० कोटींची घोषणा केली. मात्र, थोडेच पैसे आले. जेवढा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे, तेवढाच सारथीचा विषय महत्त्वाचा आहे. यात अनेक ठिकाणी केंद्र सुरु केली. मात्र, तेथील अडचणी सोडवल्या नाहीत, असे संभाजीराजे म्हणाले. पण अद्यापपर्यंत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. म्हणूनच मी आजपासून उपोषणाला बसलो आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं.

          उपोषण सुरू करण्यापूर्वी संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मी २००७ पासून महाराष्ट्रात फिरत आहे. मराठा आरक्षण का महत्वाचं आहे, याची जाणीवजागृती केली पाहिजे असे संभाजीराजे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाला सोबत घेऊन गेले नाहीत. तस सर्व समाजाच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन पुढे गेले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत असल्याचे संभाजीराजे म्हणाले.               आरक्षण मिळेपर्यंत गरीब मराठा समाजाने काय करायचे? असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला. आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. आमरण उपोषण करणे कठीण काम आहे. परंतू, २००७ पासून हा मुद्दा मी पुढे नेत आहे, आत्ता जर काही केले नाही तर काय उपयोग म्हणून मी उपोषण करत असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

            १५ दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. त्यानंतर आम्ही नाशिकला मुक आंदोलन थांबवले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला ४०० कोटींची घोषणा केली. मात्र, थोडेच पैसे आले. जेवढा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे, तेवढाच सारथीचा विषय महत्त्वाचा आहे. यात अनेक ठिकाणी केंद्र सुरु केली. मात्र, तेथील अडचणी सोडवल्या नाहीत असे संभाजीराजे म्हणाले.

          ठाणे येथे फक्त एक वसतीगृह सुरु झाले, तेही पालाकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने झाले. तुम्ही काय केलं? असा सवाल यावेळी संभाजीराजे यावेळी म्हणाले. ज्याच्यामुळे एवढे मोर्चे निघाले त्या कोपर्डीचे काय झालं? असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले. मी महाराष्ट्र पिंजून काढत असताना सर्वजण म्हणाले की, तुम्ही हे नेतृत्व केलं पाहिजे. २०१३ मध्ये मी लाखोंच्या संख्येने आंदोलन केले. ज्यावेळी जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता होती, त्यावेळी कोण मंचावर जात नव्हते, त्यावेळी मी गेलो आणि सर्वांना आवाहन केले असेही संभाजीराजेंनी यावेळी सांगितले. 

         आज आमरण उपोषणाला मी एकटाच बसणार आहे. मराठा समाजाला वेठीस धरु नये, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. मी एकटाच या उपोषणाला बसणार होतो. मात्र अनेकजण आले आहेत. कोल्हापूरसह पुणे, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, अमरावती, लातुर, अमरावती, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, अहमदनगर आदीसह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने युवक व महिला पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर आले आहेत.

No comments:

Post a Comment