चंदगड येथील फादर अग्नेल स्कुलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना डॉ. सुनिलकुमार लवटे. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पूर्वीचा काळ वेगळा होता. आता काळ झपाट्याने बदलत आहे. आई-वडिलांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आपल्या मुलांनी कोणत्याही स्पर्धेत पहिलेच यावे. अशी आई-वडिलांची धारणा झाली आहे.
वार्षिक स्नेहसंमेलन |
आई- वडील आणि शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे दिशादर्शक आहेत. आई-वडिलांनी ही आपल्या मुलांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये मतभेद न करता सर्व मुलांचा सर्वांगीण विकास करावा.
डॉ. सुनीलकुमार लवटे पुढे म्हणाले,``आम्ही लहान असताना स्नेहसंमेलनाकरिता पोशाखाची जुळवा जुळव करताना नाकीनऊ यायचे .... आता पूर्वीसारखा काळ राहिला नाही.
लहानपणातील शालेय मजा वेगळीच असते. पण विद्यार्थी लहानपणापासूनच घडवण्याचे काम हे शिक्षकांनी केले पाहिजे. इतर देशांच्या तुलनेत भारतात म्हणावा तसा शैक्षणिक विकास आणि उठाव झाला नाही. फिनलँड, युरोप यासारख्या देशांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. त्यांना मूल्य शिक्षणाचे धडे शिकवले जातात.
मान्यवरांचे स्वागत व शालेय अहवालाचे वाचन मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल यांनी केले. यावेळी शाळेत राबवण्यात आलेल्या स्पर्धा व नियोजित कार्यक्रमांचाही आढावा घेतला.
विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या व राज्य स्तरावरील क्रीडा व पेंटिंग स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.
`जय जवान जय किसान` चा नारा देण्यात आला. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाने सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मय, गायत्री, दुर्वा या शालेय विद्यार्थ्यांनी केले. यावेळी शिक्षिका वैष्णवी शिंदे व शुभांगी पाटील यांनी प्रेक्षकांना अभिवादन करून पालकांसह सर्वांचे आभार मानले. फादर अग्नेल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रिन्सिपल फादर विल्सन पॉल यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment