संतांचे विचारच संस्कृती टिकवून ठेऊ शकतात - हभप साक्षीताई अपार
जालना : सी. एल. वृत्तसेवा
संतांचे विचारच संस्कृती टिकवून ठेऊ शकतात. संतांनी आपल्याला सर्व धर्म समभाव सहिष्णुवृत्तीची शिकवण दिली त्यामुळे संतांचा वारसा नव्या पिढीमध्ये रुजविण्याची गरज आहे असे प्रतिपादन हभप साक्षीताई अपार यांनी केले. जाफराबाद तालुक्यातील शिवेश्वर संस्थान बोरगाव बु. - बोरीवाडी मठ, ता जाफराबाद. जि जालना येथे किर्तन प्रबोधनातून व्यक्त केले.
सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम व गाथा पारायण सोहळ्याचे मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह दि ०२ मार्च २०२४ रोजी सुरू झाला असुन दि. ९ रोजी महाप्रसादाने सांगता होईल.
किर्तन रुपी सेवेनिमित्त साक्षीताई अपार यांनी- काय सांगू आता संतांचे उपकार | मज निरंतर जागविती || काय द्यावे त्यासी व्हावे उतराई | ठेविता हा पायी जीव थोडा. हा अभंग घेऊन ज्याप्रमाणे आईशिवाय बापाची, सोनाराशिवाय सोन्याची, त्याचप्रमाणे संतांशिवाय देवाची ओळख होऊ शकत नाही. जिथे संतांचे पाय असतात, तिथेच देव असतात. असे विचार व्यक्त केले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment