चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, निराधार यांना शासनाकडून मिळणारी दरमहाची मासिक पेन्शन गेल्या चार-पाच महिन्यापासून मिळालेली नाही. परिणामी या सर्वांची उपासमार सुरू आहे. पेन्शन अभावी आम्ही जगायचे कसे? असा सवाल लाभार्थींनी महाराष्ट्र शासनाला केला आहे. सरकारने पेन्शनची थकीत रक्कम या महिना अखेरीस देऊन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला लाभार्थींच्या खात्यावर पेन्शनची रक्कम जमा करावी. अन्यथा आम्हाला आत्महत्या करणेची परवानगी तरी द्यावी अशी मागणी ही लाभार्थींच्याकडून करण्यात आली आहे. पेन्शन मिळत नसेल तर अपंग, निराधार, विधवा यांना दारू विकून आपला उदरनिर्वाह चालवावा लागेल असा निर्वाणीचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला असून अशी दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये अशा प्रकारच्या सूचना गृहमंत्र्यांनी पोलीस खात्याला द्याव्यात अशी मागणी 'जन आधार दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, निराधार संघटना चंदगड चे अध्यक्ष जोतिबा गोरल यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment