चंदगड / प्रतिनिधी
शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत बागिलगे (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने विविध जातींच्या ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
रामपूर हद्द ते तांबुळवाडी हद्द, बागिलगे गणेश मंदिर ते गावठाण हद्द, स्मशानभूमी परिसर तसेच पडिक जागांवर सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यांच्या दुतर्फा आंबा, फणस, साग, पिंपळ, वड यांसह सुमारे २५ प्रकारची फळझाडे व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.
'गावच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे...' या व्हॉट्सअॅप समूहाच्या माध्यमातून ग्रामस्थांसह गावातील व गावाबाहेर कार्यरत असलेल्या नोकरदारांनी आर्थिक योगदान दिल्याने ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ सरपंच नरसू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच परशराम सुतार व राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी पर्यावरण आणि मानवी जीवनाचा अतूट संबंध अधोरेखित करत, वृक्ष हे पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक असून हवेतील गारवा, पर्जन्यमान आणि पर्यावरण संतुलनासाठी त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने दरवर्षी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास माजी प्राचार्य एस. आर. पाटील, जोतिबा पाटील, लक्ष्मण पाटील, कृष्णा पाटील, संभाजी पाटील, मारुती पाटील, विलास पाटील, बाबुराव वरपे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपसरपंच परशराम सुतार यांनी मानले.

1 comment:
चंदगड कोल्हापूर प्रशासनात भ्रष्टाचाराचा उच्चांक! असहाय्य गरीब दिनदुबळ्या अन्नदात्या रयतेची लुट! भाजपा सरकारचा भ्रष्टाचाराला संपूर्ण पाठिंबा!!
आज कुणबी समाज, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी खोटे दस्त बनवून कुणबी समाजाच्या शेतजमिनी लुबाडत असल्याने हवालदिल झाला आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यात रयतेची लूटमारी, भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र भाजपा सरकारचे संरक्षण!
"सतत तीन वर्षे केंद्रातर्फे पुरस्कारीत, भ्रष्टाचारात अव्वल क्रमांक पटकावणारे भारतातील एकमेव राज्य - महाराष्ट्र!"
महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन!
हेच ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य! लोकमान्य टिळक, डॉ आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राज्य! आज तेच राज्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्याला कुणीही वाली उरला नाही.
"आमच्या अधिकाऱ्यांनी फक्त दिड लाख शेतकरी कुंटुंबांच्या जमिनी हडपल्या आहेत!" असे महसुलमंत्री मान्य करतात. पण एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी एवढी मोठी बोंब का?
खोटे दस्त बनवून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे प्रकार होत असल्याने शेतकरी हैरान आणि हताश झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने भ्रष्ट्राचार करणे न्यू नॉर्मल ठरवले आहे कि काय असे वाटू लागले आहे. दिड - दोन वर्षांपासून आम्ही चंदगड, गडहिंग्लज या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील खोटे दस्त बनवून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे स्कॅम रॅकेट मुख्यमंत्री ते महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांना अवगत करून देत आहोत. पण परिणाम शून्य!! अशी दुर्दशा झाली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या रयतेच्या राज्याची!!! मुळात मुख्यमंत्री भ्रष्ट्राचार हा गुन्हाच समजत नाहीत! पाहाः See the proofs of corruption in Chandgad, Gadhinglaj, Kolhapur:
https://sites.google.com/view/maha-farmers-agnst-corruption/forged-docs
Post a Comment