![]() |
विविध शैक्षणिक मागण्यासंदर्भात चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे याना निवेदन देताना शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी व अंगणवाडी, आशा व गटप्रवर्तक. |
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या व अशैक्षणिक निर्णयामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चंदगड तालुका शंभर टक्के बंद ठेवून प्राथमिक, माध्यमिक व आशा संघटनांनी एकत्रितपणे चंदगड तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी मागण्यांचे निवेदन चंदगड तहसिलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले.
चंदगड रवळनाथ मंदिरापासून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये चंदगड तालूक्यातील आशा माहिला संघटनेच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसिलदार कार्यालयासमोर आला. निवेदनामध्ये अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, अनुदानास पात्र असलेल्या सर्व शाळांतील तुकड्याना प्रचलित नियमानुसार अनुदान मंजूर करावे, केंद्रस्तरावरील शिक्षकाना घोषित केलेला भत्ता राज्यस्तरावरील शिक्षकांना त्वरित लागू करावा, निकषपात्र ठरलेल्या शाळांबाबत अनुदान देण्याचे नियम शिथिल करावेत, पवित्र पोर्टल प्रणाली रद्द करावी, टप्पा अनुदान २०%प्रप्त झालेल्या शाळांचे पुढील अनुदान १००% करावे, आर. टी. ई. अॅक्टनुसार दर तीन वर्षांनी पुनर्मान्याता घेण्याचे धोरण रद्द करावे, सहावी व आठवी वर्गाना शिकवणाऱ्या शिक्षकांना हायस्कूलची वेतनश्रेणी द्यावी, शिक्षकेत्तर सेवकांचा सुधारित आकृतिबंधतयार करण्यासाठी २३. १०. २०१३च्या शासन निर्णयानुसार नेमलेल्या समितीने २०१५ साली अहवाल सादर केला आहे सदर अहवाल जशास तसा लागू करावा, आर.टी.ई.नुसार शाळा तेथे प्रयोगशाळा सहाय्यक, परिवर्तन,ग्रथपाल नेमावेत, सन २०१८.१९ व पुढील संचमान्यतेचे धोरण ठरवावे, माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी पूर्वी प्रमाणेच मंजूर करावी त्याबाबतचे प्रशिक्षण आयोजित करावे, अर्धवेळ ग्रंथपाल पद पूर्ण वेळ करावे, शिक्षकाना निवडणूक कामातील बीएलओ व झेओ ही अशैक्षणिक कामे देऊ नयेत आदी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी खेडूत शिक्षण मंडळाचे संस्था सचिव प्रा. आर. पी. पाटील, रवीद्र देसाई, ए. एस. पाटील, आर. डी. कुंभार, आर. आय. पाटील, एस. एल. बेळगांवकर, एम. व्ही. कानूरकर, गोविंद पाटील, बाबूराव परिट, संतू कांबळे, पी. एम. टक्केकर, वाय. व्ही. कांबळे, पी. जे. मोहणगेकर, एस. डी. पाटील यांनी मोर्चाचे नियोजन केले. संपूर्ण चंदगड तालुक्यातील शाळा बंद ठेवून सरकारकडे शिक्षकांच्या मागण्या पोहोचविण्यात आल्या.
No comments:
Post a Comment