![]() |
भरत कुंडल |
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) अग्रो इंडिया लिमिटेड कारखान्याने काल ११ जानेवारीपर्यंत ६२ दिवसात ३,२७,५५६ टन ऊसाचे गाळप करून ३,७७,९४० पोती साखर उत्पादन केली. साखर उतारा ११.८७ पर्यंत आला आहे. गाळप झाल्यानंतर दहा दिवसात एफ. आर. पी. नुसार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहेत. ३१ डिसेंबर अखेरची सर्व बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. अशी माहिती कारखान्याचे युनिट हेड भरत कुंडल यांनी दिली.
चंदगड, आजरा, गडहिंग्लज व कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मार्फत मार्गदर्शन आहे. यामध्ये ऊसाची लागवड, नवीन बियाण्यांची माहिती, खोडवा पिकाचे नियोजन आदींचा समावेश आहे. ओलम हा एफ. आर. पी. नुसार पूर्ण रक्कम कमीत कमी दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणारा महाराष्ट्रातील पहिला कारखाना आहे. १ ते १० जानेवारी अखेर गाळप झालेल्या उसाचे पैसे उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार होणार आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी आमच्या विविध योजना तसेच उसाचे एकरकमी मिळणारे पैसे यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलो आहोत. यापुढेही शेतकऱ्यांनी कुठलीही घाई न करता जास्तीतजास्त ऊस पुरवठा करुन सहकार्य करावे असे आवाहन शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment