![]() |
उमगाव (ता. चंदगड) येथे हत्तींच्या कळपाकडून उभा ऊसाचे केलेले नुकसान. |
चंदगड तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून हत्तींचा वावर आहे. नागवे, माळी परिसरात हत्तीच्या कळपाकडून गेल्या दोन दिवसा हत्तींच्या कळपासून नुकसान सुरुच होते. या कळपाने काल रात्री आपला मोर्चा उमगाव (ता. चंदगड) येथे वळविला. यावेळी हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांच्या उभ्या ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
उमगाव येथील दत्तात्रय अनंत गावडे, सुर्यकांत गोविंद गावडे, दीपक शंकर गावडे व भागोजी गावडे यांच्या एक एकरातील उभा ऊस खाऊन फस्त केला आहे. दोन महिन्यापासून हत्तीचा या भागात वावर आहे. परिसरातील उभ्या उसात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. सध्या परिसरात एक टस्करासह दहा हत्तीच्या कळपाचा वावर आहे. त्यामुळे उमगाव परिसरातील शेतकऱ्यांचा शिल्लक ऊस तालुक्यातील साखर कारखान्यानी प्राधान्याने उचलण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वनपाल दयानंद पाटील, अस्मिता पाटील यानी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पहाणी करून पंचनामे केले.
No comments:
Post a Comment