आमदार जयंत आसगावकर यांचा सत्कार करताना प्राचार्य श्री सुर्यवंशी सोबत संभाजीराव देसाई , विद्याधर गुरबे , सुमन सुभेदार |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
चंदगडच्या ग्रामीण भागात खरी बुध्दिमत्ता लपलेली आहे. या बुद्धिमतेला जगासमोर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने शिक्षकच करत असतात. शिक्षकच देशाचे भवितव्य घडवित असतो आणि म्हणून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल ,असे प्रतिपादन पूणे विभाग शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.
श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. आसगावकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही .एन. सुर्यवंशी हाते.
प्रास्ताविक श्री पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील शाळांना भौतिक आणि शैक्षणिक सुविधा दिल्या तर शैक्षणिक क्रांती घडेल, कोरोणा काळानंतर आज शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी आनंदी आहेत. या विद्यार्थी वर्गाला आमदार प्रा . जयंत आसगावकर यानी शैक्षणिक साहित्य देण्याची मागणी प्राचार्य व्ही .एन. सुर्यवंशी यानी केली .
प्रारंभी आमदार प्रा .आसगांवकर यांचा प्राचार्य व्ही .एन. सुर्यवंशी यांच्या हस्ते तसेच चतुःश्रेणी कर्मचारी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष अजित गणाचारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तसेच गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार याना पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते शिवशक्ती हायस्कूलच्या वतीने दिलेल्या मास्कचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार, संभाजी देसाई शिरोलीकर , एस .डी. पाटील , बंकट हिशेबकर , आय .वाय. गावडे , प्रा .व्ही.पी. पाटील , आर .डी. पाटील आदि मान्यवर शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी .के. पाटील यांनी केले तर आभार एस.के. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment