कोवाड बंधाऱ्यातील बरग्यांचे काम रोखताना शिवसैनिक, व्यापारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी सुरू असलेले बरगे घालण्याचे काम आज शिवसेना, व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी रोखले. पुरास कारणीभूत बंधारा व नवीन पूल दरम्यान साठलेली गाळ-माती काढल्याशिवाय बरगे बसवू देणार नाही. अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.
प्रवाहाबरोबर येऊन पडलेली ही माती सध्या अडथळा ठरत आहे. |
याबाबत संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता; नदीतील गाळ, माती, वाळू काढणे हा धोरणात्मक निर्णय असून महसूल विभागाच्या आदेशाशिवाय आम्ही गाळ काढू शकत नाही. अन्यथा बेकायदेशीर उत्खनना बद्दल आमच्यावरच गुन्हे दाखल होतील. पण आदेश आल्यास आम्ही यंत्रणा राबवू शकतो असे सांगण्यात आले.
महापूर काळात अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनानंतर महसूल व पाटबंधारे विभाग अंतर्गत याबाबत पत्रव्यवहार झाला आहे का? की पूर आल्यानंतर दरवर्षी आश्वासनेच मिळत राहणार? असा सवाल आंदोलकांनी केला आहे. महापूरास कारणीभूत ठरणारे असे अडथळे कमी न केल्यास महापुराची टांगती तलवार ग्रामस्थ व व्यापारी वर्गावर दरवर्षी कोसळणार हे मात्र नक्की.
1 comment:
नेहमीचा येतो पावसाळा
Post a Comment