नवोदित कवींना सुवर्णसंधी, स्पर्धेसाठी कवितासंग्रह पाठवण्याची तारीख वाढवली, ३० एप्रिल अंतिम तारीख - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2025

नवोदित कवींना सुवर्णसंधी, स्पर्धेसाठी कवितासंग्रह पाठवण्याची तारीख वाढवली, ३० एप्रिल अंतिम तारीख


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
         घाटकरवाडी (ता. आजरा) येथे गंगाचंद्र साहित्य कला सेवा मंचच्या वतीने राज्यस्तरीय काव्यसंग्रह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपले कवितासंग्रह आधी १५ एप्रिल २०२५ अखेर पाठावेत असे सांगण्यात आले होते. तथापि ही तारीख पंधरा दिवस वाढवण्यात आली असून आता सर्वांनी आपले कवितासंग्रह ३० एप्रिल पर्यंत पाठवावेत असे आवाहन मंचच्या सचिव वैष्णवी पाटील यांनी केले आहे.
     विविध तीन पुरस्कारांसाठी स्पर्धा असून यातील श्रीहरी काव्य पुरस्कार सर्वांसाठी खुला आहे. जिजाई काव्य पुरस्कारासाठी फक्त महिला सहभागी होऊ शकतात. तर सुवर्णसाक्षी पुरस्कारासाठी नवोदित कवींचा पहिला काव्यसंग्रह पात्र ठरेल. स्पर्धेसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या काळात प्रकाशित झालेलीच पुस्तके पात्र असतील. एका स्पर्धकाला एकाच विभागात सहभागी होता येईल. विजेत्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप  आहे. स्पर्धेचे पुरस्कार वितरण मे महिन्यात भव्य कार्यक्रमात करणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष दत्ता पाटील यांनी दिली आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी पुस्तकाची एक प्रत, कवीची संक्षिप्त माहिती, फोटो, स्वयं घोषणा पत्रासह...  
 प्रति,
श्री दत्तात्रय हरी पाटील, मु. घाटकरवाडी, पो. किटवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर, पिन. 416505. मो. नं. 9011943445
 या पत्त्यावर फक्त पोस्टाने पाठवावेत असे आवाहन सचिव  सौ. वैष्णवी दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment