आजरा : सी एल वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्यातील कामगाराचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवार दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास आजरा - आंबोली महामार्गावरील मसोली नजीकच्या टोल नाक्या शेजारी घडली. प्रकाश गणपती घेवडे, वय ५१ रा उत्तुर, ता. आजरा असे अपघातात मयत झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव असून घटनेची नोंद आजरा पोलीसात झाली आहे.
बुधवार दि २८ रोजी सकाळी प्रकाश घेवडे हे उत्तूर येथून साखर कारखान्याच्या दिशेने जात असताना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावरून टोलनाक्याजवळ गाडी घसरली. यावळी कठड्याला डोके धडकल्याने गंभीर दुखापत झाली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. घेवडे हे आजरा साखर कारखान्यात उत्पादन विभागात काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून आजारा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment