आजरा: गोपाळ गडकरी, सी.एल. न्यूज
अखेर आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीने नगरपंचायत निवडणूकीसाठी १७ उमेदवार प्रभागात उभे करून जनतेला विविध विकास योजना, रस्ते,पाणी, नळपाणी योजना यावर विविध प्रकारे लोकांच्या असणाऱ्या विविध क्षेत्रात भेडसावणारे विकासात्मक प्रश्नांची सोडवणूक करणारे सर्व अन्याय निवारण समितीचे सर्व पदाधिकारी यांनी आपण आजरेकर मंडळींना सर्व प्रकारे मदत करणेसाठी हे पाऊल पुढे उचलले आहे.
आजरा पर्यटन असणारे रामतिर्थ क्षेत्र सर्वांसाठी खुले केले कारण आजरेकर मंडळीना पास सुविधा घेतले शिवाय रामतिर्थावर प्रवेश मिळत नव्हता प्रथमच अन्याय निवारण समितीने वाचा फोडली. दुसरा प्रश्न म्हणजे आजरा बाजार दिवशी होणारा कचरा हराव यामध्ये प्रयत्न केला त्याला काहीं प्रमाणात प्रतिसाद मिळाला कारण कचरा हटाव ठेकेदाराची मुदत संपली होती त्यावेळी सर्वत्र बाजारात कचरा हटाव यामध्येही या समितीने पुढाकार घेतला.
पैशासाठी राजकारण करून आपली घरे भरण्यापेक्षा सामाजिक कार्यात हात घालून जनतेचा आशिर्वाद घेणे अधिक महत्वाचे आहे. अशा या कार्यात आपलाही सहभाग हवा असे ध्येय समोर ठेवून आपण १७ वॉर्डत आपण उमेदवार उभे करणार यासाठी अन्याय निवारण समितीने सभा घेतली.
दिनांक १५-०६-२०२५ रोजी आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ही बैठक आजरा पार पडली. या बैठकीत आगामी आजरा नगरपंचायत निवडणूक २०२५ संदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत एकमताने ठरविण्यात आले की, अन्याय निवारण समिती नगराध्यक्ष पदासह सर्व १७ नगरसेवक पदांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. जनतेच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देण्यासाठी, आणि विकासाचा पर्याय ठरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जनतेच्या हितासाठी पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प समितीने या वेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment