नळ योजनेचे ठेकेदार व नगरपंचायत यांनी आजरेकरांचा विमा काढावा - शहरवाशीयांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2025

नळ योजनेचे ठेकेदार व नगरपंचायत यांनी आजरेकरांचा विमा काढावा - शहरवाशीयांची मागणी

 


आजरा : गोपाळ गडकरी / सी. एल. न्यूज

        आजरा येथील पाणी पुरवठा योजना नागरीकांना देणेसाठी मोठ्या प्रमाणात विकास कामाचा वेग वाढत आहे. गटारी व नळ पाणी पुरवठा यासाठी खोदकाम करून आजरा शहर संपूर्ण खड्डेमय झाले आहे. त्यामध्ये गाड्यांचे अपघात, वयोवृद्ध, नागरीक मुले यांचे घडणारे अपघात या सगळ्याला उपाय म्हणून पाणी पुरवठा ठेकेदार व नगरपंचायत यांनी नागरिकांना विमा कवच हि योजना राबवावी व नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची त्रुटी दुरुस्ती कराव्यात यासाठी निवेदन देण्यात आले. 

         नगरपंचायत प्रशासन व नवीन पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार यांच्यामुळे संपूर्ण आजरा शहर व उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, यामुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण?   असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

    दिनांक १२/०६/२०२५ रोजी आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती तर्फे मुख्याधिकारीसो नगरपंचायत आजरा यांना नगरपंचायत मार्फत पुरवित असलेल्या सुविधा मधील त्रुटी बाबत निवेदन देण्यात आले. त्या वेळी मुख्याधिकारी यांचेशी खालील मुद्यावर सविस्तर चर्चा झाली.

१) आजरा नगरपंचायत हद्दीतील संपूर्ण रस्ते पाणी पुरवठा योजनेचे कामासाठी खोदले असलेने संपूर्ण आजरा शहर व उपनगरे चिखलमय झाले आहेत सदर रस्त्यावर प्रवास करताना पादचारी अथवा वाहनधारकाचा अपघात झाले याला जबाबदार म्हणून रहिवाश्याचा विमा उतरावा किंवा यावर अपघात झालेस अपघात ग्रहस्ताला संपूर्ण वैधकिय खर्च द्यावा. 

२) बरेच ठिकाणी नवीन अगर जुन्या नळ कनेक्शनला पाणी येत नाही अशी एकाच ठिकाणी १०, १२ कनेक्शन असतील तर ताबडतोब पहाणी करून पाणीपुरवठा चालू करावा अगर जो पर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा.

३)साई कॉलनी मधील तुंबलेले गटरे त्वरीत साफ करणे विषयी सुचना देणेत आल्या त्या त्वरीत स्वच्छ करणेचे मान्य केले.

४)नगरपंचायतचे गटर स्वच्छ करणारे सफाई  कामगार पाणीपुरवठा ठेकेदाराचे कामावर पाठविले गेल्यामुळे गटारी साफ करणेचे काम बरेच ठिकाणी अर्धवट झालेली आहेत त्यामुळे गटारी तुंबून सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावरुन वहात असलेचे निदर्शनास आणून दिले यावर त्वरीत कार्यवाही करणेच्या सुचना देणेत आल्या.

५)बरेच ठिकाणी नवीन नळ योजनेचे किंवा जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी वाया जात आहे असी ठिकाणे निदर्शनास आणून दिली  या ठिकाणी पाण्याची आवश्यकता नसेल तर एन्ड कॅप बसवुन वाया जाणारे पाणी थांबवणे विषयी चर्चा करणेत आली.

५)ज्या ठिकाणी नवीन रस्त्याची कामे चालु आहेत किंवा चालू करणेची आहेत त्या ठिकाणी संपूर्ण कनेक्शन देऊन योग्य दाबाने पाणी पुरवठा होत असलेची चाचणी घेण्यात आले नंतरच कामे सुरु करणे विषयी सूचना देण्यात आल्या.

    या व्यतिरिक्त नगरपंचायत कडुन पुरविणे येणाऱ्या सुविधेतील त्रुटी बाबत  सकारात्मक चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरीत कार्यवाही करणेचे आश्वासन दिले. 

No comments:

Post a Comment