कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात गेल्या तीन चार दिवसात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढताना दिसत आहे. गतवर्षी जुलै च्या पहिला आठवडा अखेर भरलेले फाटकवाडी मध्यम प्रकल्प धरण यंदा १७ जूनला रोजी ओव्हर फ्लो झाले. तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जंगम हट्टी प्रकल्प आज २१ जून २०२५ अखेर ५०% भरला.
जंगम हट्टी प्रकल्पाची एकूण पाणीसाठा क्षमता ३३.६५ दशलक्ष घनमीटर इतकी असून पूर्ण संचय पाणी पातळी ७२६.२० मीटर तर आजची पाणी पातळी ७२०.९० मिटर आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत ६० मिलिमीटर पाऊस झाला असून २ जून पासून २० जून २०२५ अखेर ५८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग काहीही नाही.
यंदा शेती मशागतीची कामे पूर्ण होण्याआधीच मानसून पूर्व पावसाने नियमित हजेरी लावल्यामुळे धूळ पेरण्यांना ब्रेक लागला. परिणामी भाताच्या बहुतांश पेरण्या रोप लागवडी ने कराव्या लागणार आहेत.
No comments:
Post a Comment