चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कृषि विभागाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ साठी शासन निर्णय दि. 24/06/2025 नुसार राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी १ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत प्रधानमंत्री पीक वीमा योजनेचे अर्ज शेतकऱ्यांनी भरायचे आहेत.
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हफ्ता हा खरीप हंगामासाठी 2%, रब्बी 1.5% आणि खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% ठेवण्यात आला आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आले आहे. ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. या योजने मध्ये केवळ पीक कापणी प्रयोग आधारे/तांत्रिक उत्पादन आधारे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील.
बोगस विमा तसेच महसूल दस्तएवजमध्ये फेरफार करून विमा भरण्यात आला तर गुन्हा दाखल करण्यात येणार व संबंधीतास ५ वर्षा करिता काळ्या यादीत टाकण्यात येणार.
No comments:
Post a Comment