![]() |
बैठकीवेळी बोलताना आमदार शिवाजीराव पाटील, अधिकारी व कामगार |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील ९०० गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुंबई मंडळ सहमुख्य अधिकारी श्रीमती वंदना सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेवून गिरणी कामगारांच्या मागण्या शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या.
१९८२ च्या गिरणी कामगारांच्या संपामध्ये सर्व गिरण्या बंद पडल्यानंतर चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक कामगार देशोधडीला लागले. त्यापैकी फक्त ३०० कामगारांना सरकारकडून घरे मिळाली. परंतु अद्यापही ६०० कामगारांना घरी मिळाली नाहीत. त्यामुळे ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या कामगारांना अत्यंत हालाखीत दिवस काढावे लागत आहेत. या बैठकीस उपस्थित राहून त्यांच्या मागण्या मुंबई मंडळ सहमुख्य अधिकारी श्रीमती वंदना सूर्यवंशी व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या. यावेळी लवकरात लवकर शासनाने या गिरणी कामगारांना न्याय द्यावा अशी विनंती केली. यावेळी संबंधित विभागांचे शासकीय अधिकारी व प्रमुख गिरणी कामगार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment