मुंबई - विशेष वृत्तसेवा
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीतील २१ वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी ९ करोड शेतकऱ्यांना १८००० करोड रुपयांची सन्मान राशी वितरीत करण्यात येणार आहे.
पीएम किसान योजनेचे आतापर्यंत २० हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत. दिवसेनदिवस या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करत आहेत. मात्र सद्या काही जाचक अटी असल्यामुळे कागदपत्रे जमा करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. हा हप्ता देशातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून १,८०,००० करोड रुपये पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे. ई-केवायसी, ॲग्रीस्टेक किंवा एएनपीसीआय न केलेल्या शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

No comments:
Post a Comment