सातवणे येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; राजश्रीताई गावडे यांच्या हस्ते शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2026

सातवणे येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; राजश्रीताई गावडे यांच्या हस्ते शुभारंभ

 


चंदगड / प्रतिनिधी : 

    कृषी विभागाच्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत मौजे सातवणे (ता. चंदगड) येथील मराठी विद्या मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. राजश्रीताई गावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

    पर्यावरण संवर्धन, हरित परिसराची निर्मिती आणि बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला गावातील पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    यावेळी सरपंच विठ्ठल नारायण कांबळे, उपसरपंच संजय दत्तात्रय रेडेकर आणि ग्रामसेवक अभिषेक गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परशराम कडते, मराठी विद्या मंदिर सातवणेचे मुख्याध्यापक रेणू बच्चाराम कांबळे, हणमन मारुती नाईक, राजेंद्र हिंडोळे, मोहन गाडीवडर, लीला सुतार, कल्पना पिलारे, अलका पाटील, तुषार भाग्यवान, बाबू रेडेकर, किशोर पाटील, राजू गोंधळे, प्रमोद निकम, एकनाथ माने, जॉन डिसोझा तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

    कार्यक्रमाच्या समारोपावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायत सातवणेच्या वतीने उपस्थित मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

1 comment:

Changad Farmers Against Corruption said...

चंदगड कोल्हापूर प्रशासनात भ्रष्टाचाराचा उच्चांक! असहाय्य गरीब दिनदुबळ्या अन्नदात्या रयतेची लुट! भाजपा सरकारचा भ्रष्टाचाराला संपूर्ण पाठिंबा!!

आज कुणबी समाज, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी खोटे दस्त बनवून कुणबी समाजाच्या शेतजमिनी लुबाडत असल्याने हवालदिल झाला आहे.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यात रयतेची लूटमारी, भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र भाजपा सरकारचे संरक्षण!

"सतत तीन वर्षे केंद्रातर्फे पुरस्कारीत, भ्रष्टाचारात अव्वल क्रमांक पटकावणारे भारतातील एकमेव राज्य - महाराष्ट्र!"

महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन!

हेच ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य! लोकमान्य टिळक, डॉ आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राज्य! आज तेच राज्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्याला कुणीही वाली उरला नाही.

"आमच्या अधिकाऱ्यांनी फक्त दिड लाख शेतकरी कुंटुंबांच्या जमिनी हडपल्या आहेत!" असे महसुलमंत्री मान्य करतात. पण एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी एवढी मोठी बोंब का?

खोटे दस्त बनवून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे प्रकार होत असल्याने शेतकरी हैरान आणि हताश झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने भ्रष्ट्राचार करणे न्यू नॉर्मल ठरवले आहे कि काय असे वाटू लागले आहे. दिड - दोन वर्षांपासून आम्ही चंदगड, गडहिंग्लज या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील खोटे दस्त बनवून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे स्कॅम रॅकेट मुख्यमंत्री ते महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांना अवगत करून देत आहोत. पण परिणाम शून्य!! अशी दुर्दशा झाली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या रयतेच्या राज्याची!!! मुळात मुख्यमंत्री भ्रष्ट्राचार हा गुन्हाच समजत नाहीत! पाहाः See the proofs of corruption in Chandgad, Gadhinglaj, Kolhapur:
https://sites.google.com/view/maha-farmers-agnst-corruption/forged-docs

Post a Comment